चनई ( बु ) येथिल पाणी शुद्धीकरण संच (आर ओ) १ वर्षापासून बंद नागरिकाचे हाल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील चनई बुद्रुकयेथील पिण्याच्या शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्या करिता संच बसविण्यात आला मात्र ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे व नियोजनाच्या अभावाने कंत्रटदारयांच्या मनमानीमुळे गेल्या एक वर्षापासून पाणी शुद्धीकरण यंत्र बंद अवस्थेत पडले असून ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
उन्हाळ्याची तीव्रता व उन्हाचे चटके वाढले असून गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे गेल्या एक वर्षापासून गावातील संच बंद असताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे.
ग्रामपंचायत कंत्रटदाराचे साटे लोटे असल्याने याबाबत कोणतीही कारवाई केल्या गेलेली नाही तातळीने याबाबतची दखल घेऊन गावातील पाणी शुद्धीकरण यंत्र सुरू करण्यात यावा व लोकांना पाणी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुसूचित जाती जमाती सेलचे विनोद जुमडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारीद्वारे मागणी केली आहे.