ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहिरम बाबा वॉर्डातील दूषित पाण्याच्या समस्येवर उपाय

320 मीटर नवीन पाईपलाईन टाकण्यात आली

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : शहरातील वॉर्ड क्रमांक 06 येथील बहिरम बाबा वॉर्डामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त होते. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ‘बेशरम’ झाडे लावून आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनाची दखल घेत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत बहिरम बाबा नगर परिसरात 320 मीटर नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले. हे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, त्यामुळे आता सुमारे 50 ते 60 घरांना स्वच्छ आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

या उपाययोजनांमुळे नागरिकांची दीर्घकालीन पाणी समस्या मिटली असून, त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे व राजुरेड्डी यांचे आभार मानले आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये