Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

         भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे वर्ग ०९ वीच्या विद्यार्थ्यांकडून वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

        कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,धर्मेंद्र दुधे,किशोर संगिडवार,शेखर प्यारमवार,रिंकी कोतपल्लीवार,प्रनोती सोनुले यांनी विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शन केले. तसेच वर्ग ०९वीआणि १० च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा भाऊक होऊन मनोगत व्यक्त केले.

       कार्यक्रमाचे संचालन अनुष्का येलट्टीवार आणि अश्विनी लाटेलवार तर आभार अर्णव सुर्यवंशी याने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर जीवतोडे,प्रथमेश वारजुरकर,उर्मिला बारेकर,तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये