ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक मानिकगड सिमेंट धुळप्रदूषण थांबवा

शेतकऱ्याना नुकसानीची आर्थिक मदत द्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

           गडचांदूर स्थित (मानीकगड सिमेंट) चे अल्ट्राटेक युनिट गडचांदूर लगतच्या सिमेंट प्रकल्पाला लागूनच असलेल्या थुट्रा महसुली गाव क्षेत्रात असलेल्या गोपालपुर थुट्रा येथिल आदिवासी शेतकऱ्यांनी धुळीच्या कणामुळे वायु प्रदूषणामुळे शेतातील खरीप व रब्बी हंगामातील उत्पादनाला फटका बसल्याने शेतकरी कर्जबाजारी व हवालदिल झाले आहे प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेकदा तक्रारी देऊन सुद्धा कंपनीवर कोणताच परिणाम झालेला नाही.

यामुळे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषणामुळे मानव जातीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने मधुमेह रक्तदाब अटॅक किडनी व शरीरावर चर्म रोग तसेच धुळीमुळे श्वासोस्वास दम्याचे आजारीरुग्णांची संख्या दिवसागणिक वाढ होत असून गोपाळपूर गडचांदूर या गावात संपूर्ण गाव घरात वापर करण्याच्या वस्तू यावर धुळीचे थर जमत असल्याने नवीन पिढी पुढे आव्हान असल्यामुळे भविष्यातील आरोग्याचे आजारामुळे नागरिक त्रस्त झाले आहे गावाला कंपनी लागून असलेल्या शेती शिवारामध्ये काळ्याभोर जमिनी सुपीकता नष्ट होऊन नापीक जमिनी कसत असल्यामुळे शेतीमध्ये कमालीचे उत्पादनाची घट झालेली आहे.

शेतीचा खर्च वाढला असताना उत्पादन कमालीचे घटत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे प्रदूषणामुळे पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून झाडावरील धुळीमुळे मजूर देखील कामावर येण्यास तयार नाही जमिनी कठीण व कडक होत असल्याने शेतीचा हंगाम करणे देखील शेतकऱ्यांना कठीण झाले आहे प्रदूषणामुळे जमीन प्रदूषित वबीज उगवण शक्ती कमालीची घटलेली आहे त्यामुळे निर्माण होणारे पीक अल्प व कापूस मिरची तूर सोयाबीन या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्यामुळे शेतकरी दोन कंपन्यांच्या मध्यभागी कैची मध्ये सापडला आहे मात्र माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणा प्रकोप कमालीचा वाढला असून शेतामधील जनावरांना चारा देखील उपलब्ध होत नाही.

उत्पादित केलेल्या पिकापासून जनावरांचे खाद्य म्हणून जवारी तुरी याचे कुटार खाद्य देखीलजनावरे धुळीमुळे खात नाही शेतामध्ये झाडाच्या पायथ्याशी सहा ते चार इंच धुळीचे थर जमा झाल्याने मातीचे परीक्षण करणे आवश्यक झाले आहे कोणतेही पीक जमिनीत होत असल्याने शेतकऱ्यांपुढे पर्याय उरलेला नाही याकरितागोपालपूर येथील अनिल मळावी सुरेश आत्राम मानकु तोडासाम दिनकर कुळमेथे विनोद भालेराव यानी राष्ट्रवादी कॉग्रेस चे नेते आबीद अली याच्या नेतुत्वात तहसिलदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदार चिडे व तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देऊन 35 ते 40 शेतकऱ्यांच्या सिमेंटचे धूळ व कंपनीच्या कोळशाच्या धुळीमुळे शेती उध्वस्त झाल्याने चौकशी करण्यात यावी.

तसेच मौका पंचनामा करूनआर सी पी एल सिमेंट कंपनीच्या धरतीवर शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदतीच्या चारपट हेक्‍टरी 54200/-अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे या जमिनी शेती करणे योग्य राहिले नसल्यामुळे कंपनीने जमिनी भूसंपादन करून बाजारभावाप्रमाणे आम्हाला मोबदला द्यावा व प्रदूषण नियंत्रण मंडळ कृषी विभाग व महसूल विभाग यांच्या मार्फतीने थुट्रा शिवारातीलचौकशी करून कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये