राजमाता जिजाऊ जन्मदिनी महावितरण तर्फे अभिवादन
तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती प्रित्यर्थ अभिवादन

चांदा ब्लास्ट
राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. यांना त्यांच्या जयंतीनिमित्त महावितरण चंद्रपूरतसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती प्रित्यर्थ अभिवादन परिमंडळाद्वारे विनम्र अभिवादनकरण्यात आले.
तसेच योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद यांनाही त्यांच्या जयंतीनिमित्त आज चंद्रपूर परिमंडळात सर्वत्र अभिवादन करण्यात आले. सहा.महाव्यवस्थापक श्री.रामचंद्र वैदकर, यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली, तर उपकार्यकारी अभियंता कांचन झेले यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी,वरिष्ठ व्यवस्थापक सुशिल विखार, उपविधी अधिकारी शैलेंद्र फुले, व्यवस्थापक (वि व ले ) सचिन जीवणे, भूपाल बेडेकर, प्रदीप जिंदे, सहा अभियंता – अमोल पिंपळे व नगराळे, कुरेकार, पाटील, साखरकर, ठाकरे, शिरपूरकर, ताजने, शेडामे, खोंड, चाचेरकर व रोशनी वंजारी,शारदा नारे, सविता भजभूजे, उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी स्वामी विवेकानंदव राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व आदरांजली अर्पण केली.