ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदेवाही शहरामध्ये थंडीचा कडाका वाढला

थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही – सततच्या रिप- रीप अवकाळी पावसामुळे सतत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे गेल्या थंडीचा कडाका वाढला आहे. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने चांगलीच थंडी जाणवत आहे. थंडीपासून बचावासाठी आता सिंदेवाही शहरा सह ग्रामीण भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे पहायला मिळत आहे. काही जण गुलाबी थंडीचा आनंद घेत बाहेर फीरताना दिसत आहेत. तर अनेकांनी गारवा वाढल्याने घरीच बसणे पसंत केले आहे.तसेच शहरातील नागरिक आपल्या प्रतिष्ठानासमोर शेकोटी पेटवून बसले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये