मनोज जरांगें पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी गडचांदूरात उपोषण !
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचं २५ ऑक्टोबर २०२३ पासून आमरण उपोषण सुरू आहे. सरकारकडून त्यांची मनधरणी करण्यात येत आहे. परंतु, त्यांनी अद्यापही त्यांचं हे उपोषण मागे घेतलं नाही. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक गडचांदूर मध्ये देखील सकल मराठा बांधव तालुका राजुरा,कोरपना व जिवती यांच्या सहकार्याने अभिमन्यू चव्हाण ( पाटील ) यांनी आजपासून तीन दिवशीय लक्षणिय उपोषण सुरू केल आहे. उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून जालना येथे बेमुदत उपोषण करत आहेत. मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. असं असताना मनोज जरांगे हे मात्र मराठा आरक्षणावर ठाम आहेत.
त्यांच्या याच उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अभिमन्यू चव्हाण (पाटील) हे उपोषणाला बसले आहेत. आजपासून गडचांदूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी हे उपोषण सुरू केल आहे.