ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्याच्याच ठिकाणी वर्धेत निर्माण करा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

_वंचित बहुजन आघाडी (कामगार युनियन सेल) यांचे कडून मागणी

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यात होणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वर्धा या शहरामध्येच व्हावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी (कामगार युनियन सेल) यांचे द्वारे करण्यात आलेली आहे. मा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असून जिल्ह्यातील इतर तहसील यांचे साठी केंद्र स्थानी आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धेत झाल्यास जिल्यातील कोणत्याही तहसील वर अन्याय होणार नाही. सर्वांसाठी सोयीचे ठरेल.

इतर जिल्ह्यात शासनाने प्रस्तावित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्या जिल्ह्याच्याच ठिकाणी योजीलेले आहे व त्यासाठी शासन मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये हिंगणघाट, आर्वी तसेच कारंजा या तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होनेबाबत चढाओढ सुरू झालेली आहे. त्यासाठी उल्लेखित तीनही ठिकाणी वर्धा येथे अगोदरच दोन वैद्यकीय महाविद्यालय असल्याचे त्यांचे कडून सांगण्यात येत आहे. परंतु येथे असणारी ही वैद्यकीय महाविद्यालये ही खाजगी महाविद्यालये आहेत हे मात्र कुणीच सांगत नाही. देश स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभावी वर्धा जिल्ह्यात आजतागायत फक्त खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भरवशावर येथील गोरगरीब आणि सामान्य जनता स्वतःचा पैसा मोजून आरोग्य सेवा घेत आहे.

इतर जिल्ह्यातही जिल्ह्याचाच ठिकाणी अगोदरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालय असूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याच शहरात कार्यरत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालय यामधे मिळणाऱ्या सुविधा याबाबतीत येथील गोर गरीब जनता अनभिज्ञ आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळणाऱ्या सेवा ह्या बहुतांश मोफत असतात व संपूर्ण जिल्ह्यातील गोर गरीब जनतेचा विचार केला असता वर्धा हे शहरच मुख्य केंद्रस्थानी आहे व त्याचा जिल्ह्यातील इतर तालुक्यातील लोकांना समान फायदा मिळेल व जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील लोकांवर अन्याय होणार नाही. निवेदनात त्यांनी प्रमुख तार्किक बाब उल्लेखित केली की सध्या आर्वी किंवा हिंगणघाट या दोनपैकी एक ठिकाण शासनाने निवडल्यास निश्चितच दुसरे किंवा इतर तहसील शासकीय वैद्यकीय सेवेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दोन्ही शहरे ही एकमेकांपासून साधारण शंभर किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे सर्वाना सोयीचे हे वर्धा हे शहरच योग्य ठरेल. *शासनाने जिल्ह्यातील कोणत्याही एका तहसील पुरता मर्यादित तसेच स्थानिक राजकीय फायद्याचा विचार न करता लोकाभिमुख व सर्वसमावेशक लोकहिताचा विचार करावा.

अशी मागणी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. सुरेशजी रंगारी, अंकुश वाढवे प्रमोद मुंजेवार प्रतिम वानखेडे सुभाष मेंढे आशिक शेख प्रणय डांगे कुणाल नवघरे विनोद वासेकर अमर फुसाटे सिमा रंगारी साधना उईके सचिन हिवरकर सहकारी तसेच मोठ्या प्रमाणात उपस्थित नागरिकांनी शासनास केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये