चांदा ब्लास्ट :सावली:प्रा.शेखर प्यारमवार
गोंडवाना विध्यापिठाचे सर्व पदवी शाखेच्या सेमिस्टर चे निकाल जाहिर करण्यात आले.या मध्ये एक दोन विद्यार्थ्यांना नाहीतर शेकडो विद्यार्थ्यांना इंग्रजी, समाजशास्त्र,अर्थशास्त्र, मराठी, झूलॉजी, केमिस्ट्री व इतर विषयामध्ये शून्य, एक ,दोन ,तीन,पाच ,असे गुण देण्यात आले जे की थेरी विषयामध्ये शून्य, एक मार्क्स मिळणे कधीच शक्य नाही ते असे चुकीचे गुण देऊन शक्य करून दाखविले.
हीच चूक नाही तर मिलीटरी सायन्स, समाजशास्त्र विषयात 42 आणि 45 गुण असून सुद्धा निकाल नापास म्हणून देण्यात आला. जे विद्यार्थी प्रॅक्टीकल ला उपस्थित होते आणि वायवा ला सुद्धा उपस्थित होते यांना सुद्धा नापास करण्यात आले. नेमकं कोणत्या कारणांनी हे सर्व दरवर्षी प्रत्येक सेमिस्टर ला अस होत आहे.
यामुळे गडचिरोली,चंद्रपूर सारख्या ग्रामीण भागांतील स्वातंत्र्य नंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या पहिल्या पिढीच्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्याकन करिता प्रत्येक विषयानुसार 500 रुपये शुल्क द्यावा लागतो जे की ते महाराष्ट्रातील इतर विध्यापिठमध्ये 250 रुपये आहे. हे करून सुध्दा विद्यार्थी पास होत नाही.यामुळे विद्यार्थी वारंवार नापास झाल्याने उच्चशिक्षण सोडून देतो आणि तो बेरोजगार बनतो यास जबाबदार सर्वस्वी विध्यापिठ गुणदान विभाग आहे.
हा सर्व प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे परंतु कोणत्याही कॉलेज प्राचार्य किंवा विद्यार्थी संघटनेने याकडे लक्ष दिलं नाही.
याची दखल घेऊन मानव अधिकार संरक्षण मंच व नेचर फाउंडेशन नागपूर चे सचिव निलेश ननावरे यांनी कुलसचिव गोंडवाना विध्यापिठ मार्फ़त राज्यपाल, मुख्यमंत्री, तंत्र व शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य याना या सर्व प्रकरणाची तातडीने विभागीय चौकशी करण्यात यावी या करिता निवेदन दिले आहे.