केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
निपून महाराष्ट्र कृती कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने 9 एप्रिल 2025 रोज बुधवारला जिल्हापरिषद प्राथमिक शाळा विहीरगाव केंद्र गेवरा ता. सावली जि चंद्रपूर येथे सातवी शिक्षण परिषद संपन्न झाली.
या शिक्षण परिषदेअंतर्गत अतिशय महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शनपर चर्चा घेण्यात आली. त्यामध्ये निपून महाराष्ट्र कृती कार्यक्रम, चावडी वाचन कार्यक्रम, स्वागत निपून महा. अभियान ओळख उद्दिष्ट कार्यपद्धती जबाबदारी व चर्चा, त्याचप्रमाणे अध्ययन स्तर पडताळणी चर्चा व नियोजन, कृती कार्यक्रम कार्यपद्धती अमलबजावणी व नियोजन इत्यादी विषयावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
या शिक्षण परिषदेची उद्दिष्टे होते की नवीन उपक्रम साध्य केलेल्या शिक्षकाचे अनुभव कथन व नियोजन त्याचप्रमाणे वाचन कौशल्य प्राप्त करण्यासाठी अध्ययन कृती कार्यक्रम सादर करणे, लेखन कौशल्य प्राप्त करण्यासाठी अध्ययन कृती सादरीकरण, संख्याज्ञान कौशल्य प्राप्त करण्यासाठीच्या अध्ययनकृतीचे सादरीकरण, संख्यावरील क्रिया कौशल्य प्राप्त करण्यासाठी अध्ययन कृतीचे सादरीकरण, भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यासाठी शैक्षणिक साहित्याचा वापर करून नाविन्यपूर्ण बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे यावर महत्वपूर्ण चर्चा झाली.
शिक्षकांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय योजना इत्यादीवर महत्वपूर्ण चर्चा व मार्गदर्शन घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ प्राणहिता ताई जनबंधू उपाध्यक्ष शाळा समिती विहिरगाव तर उद्घाटक म्हणून माननीय श्री शामरावजी बावणे सर शिक्षण विस्तार अधिकारी पचायत समिती सावली तसेच मार्गदर्शक म्हणून मुकुंदा गव्हारे केंद्रप्रमुख गेवरा, नित्यानंद रामटेके सर, संजय झाडे सर, वांढरे मॅडम, धनराज सुरपाम सर, सुखदेवे सर, देवराव सहारे सर, निर्मल मॅडम, मुख्याध्यापक नाहगमकर सर, घनश्याम दोनोडे सर, प्रमोद उईनवार सर उपस्थित होते . सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गेवरा केंद्राचे केंद्र प्रमुख गव्हारे सर यांनी उत्कृष्टपणे केले तर सूत्रसंचालन गद्देकर सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा विहीरगाव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री भांडेकर सर यांनी केले. सदर कार्यक्रमात शिक्षण विषयक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करण्यात आली.
याकरिता गेवरा केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत मार्गदर्शन व चर्चा कार्यक्रम सुंदर झाल्याचे बोलल्या जात होते. सूलभकाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ही शिक्षण परिषद यशस्वी झाली. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.