Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट

     शहरामध्ये १७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती विर्सजन असल्याने विर्सजन मिरवणुकीमध्ये मोठया प्रमाणात नागरीकांची गर्दी होत असते. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव विर्सजन कार्यक्रमात रहदारीला अडथळा व जनतेला त्रास होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. याकरिता शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.

मुंबई पोलीस अधिनियम- १९५१च्या कलम – ३३ (१) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणाची रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी व करावयाच्या नियमनासाठी शहरातील मुख्य मिरवणुकीचा मार्ग रहदारीमध्ये बदल म्हणून १७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजतापासून ते १८ सप्टेंबर २०२४ च्या सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कळविले आहे.

गणेश विर्सजन मुख्य मिरवणूक सोहळा पार पडेपर्यंत प्रियदर्शनी चौक ते जटपूरा गेट–कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गे, रामनगर रोड मार्गे संत केवलराम चौक–इरई नदी (दाताळा पुल) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत आहे. नागपूर रोडने येऊन बल्लारपूर किंवा मुलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही प्रियदर्शनी चौककडे जाण्यास बंदी करून सर्व प्रकारची वाहने ही वरोरा नाका उड्डानपुल- सावरकर चौक ते बंगाली कॅम्प, मुल किंवा बल्लारशाकडे जातील.

मुल किंवा बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प- सावरकर चौक, वरोरा नाका नवीन उड्डानपुल मार्गे नागपूरकडे जातील. तसेच नागपूरकडून शहरामध्ये जाणारी सर्व वाहने (जड वाहने वगळुन) छोटा नागपुर मार्गे दाताळा चौक-देवाळा गांव- चोराळा टी पॉईंटवरून बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेटमधून शहरात प्रवेश करतील. चंद्रपूर शहर पो.स्टे. हद्दितील रहीवाशांनी नागपूर, वणी, घुग्घुस व गडचांदुरकडे जाण्याकरीता रहमत नगर, नगीनाबाग व इतर परीसरातून जाण्यासाठी बिनबा गेट- चोराळा- दाताळा आदी मार्गाचा अवलंब करावा. बल्लारशा व मुलकडून येणाऱ्या सर्व वाहनांना (जड वाहने वगळुन) शहारामध्ये जायचे असल्यास बस स्टॅंड- एलआयसी ऑफीस-बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पम्पकडुन बाबुपेठ मार्गे शहरात फक्त अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवेश करता येईल.

या ठिकाणी असेल ‘नो पार्किंग व नो हॉकर्स झोन’ :

गणेश विर्सजन मुख्य मिरवणुक सोहळ्यादरम्यान ‘नो पार्किंग झोन’ व ‘नो हॉकर्स झोन’ करण्यात आले आहेत. यामध्ये, जटपुरा गेट ते कस्तुरबा चौकपर्यंत, जटपुरा गेट ते रामनगर रोड मार्गे दाताळा पुलपर्यंत, जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौकपर्यंत, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेटपर्यंत, गांधी चौक ते मिलन चौक ते जोड देऊळपर्यंत, कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक, दस्तगीर चौक ते मिलन चौक, मिलन चौक ते बजाज पॉलीटेक्नीक कॉलेज, पोटदुखे यांच्या घरापासुन ते श्री टॉकीजपर्यंत, हिंदी सिटी हायस्कुल ते रघुवंशी कॉम्प्लेक्स पर्यंत, मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीजपर्यंत, छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदीरापर्यंत.

          सदर मार्गावर नो- पार्किंग व नो- हॉकर्स झोन घोषित करण्यात आल्याने मिरवणूक व वाहतूक मार्गावर नागरीकांनी, व्यवसायिकांनी तसेच गणेश विर्सजन भक्तांनी कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग किंवा उभी करु नये.

मुख्य मिरवणूक मार्गावर राहणाऱ्या रहिवाशांना स्वत: ची पार्कींगकरीता जागा नसल्यास त्यांना आपली वाहने जुबली हायस्कुलचे पटांगण, महानगरपालिकेच्या बाजुला असलेली पार्किंग या ठिकाणी उभी करता येतील. परंतू मिरवणूक संपल्यानंतरच ती वाहने तेथून काढता येतील. त्याचप्रमाणे, चंद्रपूर शहरात मोठया प्रमाणात साजरा होणारा गणपती विर्सजन सोहळा पाहण्यासाठी शहरातील व इतर ग्रामीण भागातून नागरीक येत असतात. दरम्यान शहरात वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून नागरीकांना खालीलप्रमाणे पार्किंग झोन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

चंद्रपूर शहरातील व इतर ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध पार्किंग झोन :

चंद्रपूर शहरातील व इतर ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहे. यामध्ये, चांदा क्लब ग्राउंड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका, सेंट मायकल हायस्कूल, नगीनाबाग, सिंधी पंचायत भवन, संत केवलराम चौक जवळ रामनगर, व्यायाम शाळा ग्राउंड, पठानपुरा चौक, डी.एड. कॉलेज ग्राउंड, बाबूपेठ, महाकाली मंदीर ग्राउंड, चंद्रपूर हि ठिकाणे दि. १७ सप्टेंबरचे सकाळी ६ वाजतापासून ते १८ सप्टेंबर २०२४ च्या सकाळी ६ वाजेपर्यंत नागरीकांसाठी पार्किंग स्थळे म्हणुन घोषित करण्यात येत आहेत.

नागरीकांनी आपली वाहने शहरात न आणता दिलेल्या पार्किंगस्थळी पार्क करावीत. जनतेने विर्सजनादरम्यान वाहतूक व्यवस्थेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्याकरिता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये