Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महावितरणचा कंत्राट कामगाराचा खांबावर काम करीत असतांना करंट लागून मृत्यू 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :- महावितण (MSEB )ने नवीन नियम नुसार घरातले मीटर काढून खांब वर बॉक्स मध्ये लावण्यात येत आहे.अशातच दादाभाई नौरोजी वॉर्ड अचानक प्रगट हनुमान मंदिर जवळ चा खांब वर काम करीत असतांना अचानक वीज चालू करण्यात आली आणि काम करीत असतांना मृतक कामगार सचिन कुलकर्णी रा  नांदेड खांब वरच करंट लागून चिपकून मृत्यू झाला.

कंत्राटदार उमर शेख महमूद मेनियार रा, लातूर जिल्हा यांनी कोणतेही सुरक्षा कवच कामगारांना दिले नाही शहरात सर्वच ठिकाणी घरातले वीज मीटर काढून खांब वर बॉक्स मध्ये लावण्यात येत आहे सर्वच कामगार बाहेर जिल्ह्यातील लातूर, अंबेजोगाई, नांदेड वरून 24जुन पासून शहरात काम करीत आहे आता पर्यंत 40ते 50बॉक्स लावण्यात आले.दादाभाई नौरोजी वॉर्ड आणि महाराणा प्रताप वॉर्डातील वीज दुपारी दोन वाजता पासूनच बंद करण्यात आली होती.

परंतु सायंकाळी साडे सहा चा दरम्यान नगर परिषद चे कामगारांनी अचानक पने(पोल) खांब चे करंट चालू केले आणि खांब वर काम करीत असलेला सचिन कुलकर्णी चा करंट लागून मृत्यू झाला.सहकारी कामगारांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलीस मर्ग दाखल करून तपास करून दोषी वर मनुष्य वध चा गुन्हा दाखल करून कारवाई होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये