ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवीन संच मान्यता आदेश रद्द करा

शिक्षक परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण मंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          दि. 15 मार्च 2024 च्या संच मान्यता निकषानुसार प्राथमिक शिक्षक संख्या निर्धारणावर विपरीत परिणाम पडला असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होऊन वर्ग बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल देठे, जिल्हा कार्यवाह विलास खाडे, जिल्हा कोषाध्यक्ष अजय बेद्रे, दिलीप कुमार राठोड, सतीश डांगरे, सतीश दुवावार, शंकर निखाडे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये