राहुरी येथील वकील दांपत्याच्या हत्येचा भद्रावती तालुका अधिवक्ता संघातर्फे निषेध
एडवोकेट प्रोटेक्शन अक्टची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी : तहसीलदारांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अहमदनगर जिल्ह्यातील राजुरी तालुक्यातील एडवोकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी एडवोकेट मनीषा आढाव या वकील दांपत्याची निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेचा तपास सीआयडी यंत्रणेकडे द्यावा व वकिलांच्या सुरक्षिततेसाठी एडवोकेट प्रोटेक्शन अक्टची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी.
या मागणीचे निवेदन भद्रावती तालुका अधिवक्ता संघाद्वारे दिनांक 31 रोध बुधवारला सकाळी 11 वाजता येतील तहसीलदाराच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी एक सभा घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. सध्या वकिलांवर हल्ले व खोट्या केसेस करण्याचे प्रमाण राज्यात वाढले असल्यामुळे कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही एडवोकेट प्रोटेक्शन अक्ट त्वरित लागू करावा अशी मागणी अधिवक्ता संघाद्वारे करण्यात आली.
यावेळी सदर प्रोटेक्शन अक्ट अद्यापही लागू करण्यात न आल्याने राज्य सरकारचाही निषेध करण्यात आला. सदर वकील दांपत्याची निर्घुण हत्या हा गांभीर्याचा विषय असल्याचे निवेदनातून म्हटले गेले. निवेदन सादर करताना भद्रावती तालुका अधिवक्ता संघाचे पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित होते.