ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अजय दुबेंनी घेतली रेल्वे राज्यमंत्र्यांनी भेट

बल्लारपूर मार्गे जाणाऱ्या विविध रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची केली मागणी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राष्ट्रीय रेल्वे ग्राहक सल्लागार परिषदेचे (NRUCC) सदस्य व जेष्ठ पत्रकार अजय दुबे ह्यांनी केंद्रीय रेल्वे तथा कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे ह्यांची दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी 20 सप्टेंबर रोजी भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांशी मंत्र्यांना अवगत करून दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. बल्लारशाह रेल्वे स्थानक मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक असुन ह्या ठिकाणाहून दक्षिणेकडील राज्यात जाणाऱ्या सर्व गाड्यांना थांबा आहे. हे स्थानक देशातील सर्वोत्तम असुनही ज्याठिकाणी हव्या त्या प्रमाणात सोई सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याने प्रवाशांना बरेचदा समस्या निर्माण होत असल्याने ह्या सर्व समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी अजय दुबे ह्यांनी केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यात अनेक अडचणी असुन बल्लारशाह स्थानकावरून थेट मुंबई जाण्यासाठी केवळ एकच रेल्वे उपलब्ध असुन ती सुद्धा आठवड्यातून एकदाच असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने कुर्ला बल्लारशाह ट्रेन रोज सोडण्यात यावी तसेच जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत तर कित्येक युवक तिथे नोकरीला असल्याने जिल्ह्यातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काझिपेठ पुणे दरम्यान धावणारी गाडीच्या आठवड्यातून निदान तिन फेऱ्या तरी करण्यात याव्या अशी आग्रही मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ह्यांना करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये