गर्दीचा फायदा घेवुन बसस्टॅन्ड व मार्केट मधुन मोबाईल चोरी करणारी टोळी पोलीसांच्या जाळयात.
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
फिर्यादी संजय बाबरावजी ठाकरे वय 58 वर्ष रा. कौडण्यपुर ता. तिवसा. जि. अमरावती यांनी दिनांक 20/03/2025 रोजी पो.स्टे. आर्वी फिर्यादी दिली की, दिनांक 13/03/2025 रोजी परडा जि. वर्धा येथे किर्तनाचा कार्यक्रम असल्याने मी कौंडण्यपुर येथुन फिर्यादी हे त्यांचा पुतण्या गौरव ठाकरे याचे मोटर सायकलवर बसुन आर्वी बस स्टॅन्ड येथे गेले. आर्वी वर्धा बस मध्ये चढतांना गर्दी असल्याने बस मध्ये चढले व बस मध्ये सिटवर बसतांना खिश्याला हात लावला असता त्यांना मोबाईल खिश्यात दिसला नाही. म्हणुन फिर्यादी बस चे खाली उतरले. मोबाईल कुठेतरी पडला असे म्हणुन फिर्यादी पोलीस स्टेशन आर्वी येथे येवुन मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली. दि. 18/03/2025 रोजी फिर्यादी पैश्याची आवश्यकता असल्याने कौंडण्यपुर येथुन आर्वी येथे बैंक ऑफ महाराष्ट्र येथे जाऊन पैसे काढण्यासाठी बैंक मध्ये पासबुक दिले त्यांनी पासबुक घेऊन बैंक अकाउंट चेक करून सागितले की, फिर्यादी यांचे ऑकाऊँटला पैसे नाहीत. फिर्यादी यांनी बैंक अकाऊंटचे स्टेटमेंट काढुन पाहीले असता अकाउंट मधुन एकुण 1,73,500/-रु कोणीतरी अज्ञात इसमाने काढुन चोरुन नेल्याचे दिसले. तसेच फिर्यादी यांना इतर बैंक खातेमधुन पैसे गेल्याची शंका झाल्याने एस.बी.आय. बैंक शाखा कु-हा येथे जावुन अकाऊंटचे स्टेटमेंट पाहीले असता त्यामधुन एकुन रु.2.79.999/-कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेल्याचे दिसले. दि. 13/03/25 रोजी हरविलेल्या मोबाईल फोनचा पासवर्ड 1234 होता व त्यामध्ये असलेला फोन पे अॅपचा पासवर्ड 123456 होता. दि. 13/03/25 ते दि.15/03/25 पर्यंत फिर्यादी यांच्या हरविलेल्या मोबाईलचा वापर करुन कोणीतरी अज्ञात इसमाने बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा आर्वी व एस.बी.आय बैंक शाखा कु-हा मधुन एकुन 4,53,499 रु. चोरले आहे. अशा फिर्यादी यांच्या तोंडी रिपोर्टवरुन पो.स्टे. आर्वी येथे अप क्र. 275/2025 कलम 303 (2) मा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचा समांतर तपासस्थानिक गुन्हे शाखा वर्धा व सायबर सेल मार्फत करण्यात आला. तपासदरम्यान तांत्रीक बाबींचा वापर तसेच गोपनीय माहितीच्या आधारे मोबाईल चोरांची टोळी ही झारखंड राज्यातील असल्याचे समजले. सदर टोळीबाबत अधीक माहिती घेतली असता सदरची टोळी ही नागपुर येथे वास्तव्यास असुन वेगवेगळ्या जिल्हयात बाजाराच्या दिवशी नागपुर येथुन गाडी क्र. एम.एच.40 सी.एच. 0102 पांढरी स्विफ्ट डिझायर ही भाडयाने घेवुन गुन्हा करण्याकरीता वापरतात. अश्या माहिती गोपनीय सुत्रांना देण्यात आली. त्यावरुन दिनांक 17/04/2025 रोजी सदरची टोळी ही वर्धा येथे येत असल्याची माहिती मिळाल्याने आजुबाजुच्या परीसरात सदर गाडीचा शोध घेत असता गाडी क्र. एम.एच.40 सी.एच. 0102 पांढरी स्विफ्ट डिझायर ही जुना पाणी चौक येथुन वर्धा शहर परीसरात येताना दिसल्याने गाडीला थांबविण्यात आले. गाडीमध्ये असलेल्या इसम 1) शेख टिंकु शेख उमर, वय 19 वर्ष, रा. डाक बंगला, महाराजपूर, साहेबगंज, झारखंड 2) शेख रिजवान शेख बोल्लु, वय 35 वर्ष रा. डाक बंगला, महाराजपूर, साहेबगंज, झारखंड, 3) विधीसघर्षीत बालक रा. मोतीझरणा, झारखंड 4) चालक आकाश गोकुल पाटील वय 31 वर्ष रा. शंभुनगर मानकापुर असे ताब्यात घेवुन विचारपुस केली असता उडवाउडविचे उत्तर दिल्याने त्याना पोलीसी हिसका दाखवले असता सदर आरोपीतांनी माबाईल चोरीकरीता आले असल्याचे कबुल केले. तसेच अधीकची विचारपुस केली असता नेहमी बाजारपेठ, बसस्टॅन्ड व इतर गदीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरत असल्याचे सांगितले. सदर टोळी ही 30 ते 35 मोबईल चोरुन जमा करुन झारखंड व आजुबाजुच्या परीसरात विकत असल्याचे सांगितले. आरोपीतांकडुन एकुण 13 मोबाईल, रोख रक्कम व कार एकुण किंमत 8.46,200/-रु चा जप्त करुन गुन्हा उघडकिस आणला. सदर मोबईल हे काटोल, चंद्रपुर व इतर ठिकाणाहुन चोरी केल्याचे सांगितले. तसेच वरोरा येथे मोबाईल चोरीबाबत गुन्हा नोंद आहे.
सदरची कारवाई मा. श्री अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, सहा. पोलीस निरीक्षक सुमंतराज भुजबळ, पोउपनि बालाजी लालपालवाले, पोलीस अंमलदार नरेंद्र पाराशर, संघसेन कांबळे, नितीन इटकरे, सागर भोसले, मिथुन जिचकार सर्व स्थनिक गुन्हे शाखा वर्षा तसेच पोलीस अंमलदार दिनेश बोथकर, विशाल मडावी, अनुप कावळे, अंकित जिभे सर्व सायबर सेल वर्धा यांनी केली.