कोलांडी येथील आश्रमात स्वजागृती वर शिबिर संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
ज्ञान गंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था व गौसेवा केंद्र कोलांडी/नंदप्पा येथे दिनांक 17 व 18 जून ला स्वजागृती विषयावर आधारित शिबिर संपन्न झाले
यामध्ये वय 13वर्ष ते 25वर्षा पर्यंत च्या 90ते 100मुला/ मुलींनी शिबिरात सहभाग घेतला
आजच्या युगात तरुण ला शैक्षणिक ज्ञाना सोबत आध्यात्मिक ज्ञान सुद्धा सुखी जीवन जगण्यासाठी किती आवश्यक आहे यांचे महत्व पटवून देण्यासाठी आणि ते ज्ञान आचरणात प्रयोग करून जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या पध्यतीने साहाय्यक होते हे उदाहरणात सहित पटवून दिले
ह्या दोन दिवसीय निसर्ग रम्य वातावरणात मुला /मुलींचा उत्साह द्विगुणीत झाला त्यांनी आनंदाने हे ज्ञान स्वीकारून भविष्यात या ज्ञानाचा जीवनात उपयोग करून यांचा लाभ करू अशा प्रतिक्रिया मुला/मुलीनं कडून व्यक्त झाल्या.
ह्या शिबिराच्या माध्यमातून “मन” अवस्था आणि त्यामधून जीवनात होणारे लाभ /नुकसान ह्याचे महत्व, सुखी जीवनासाठी आपलं मन
स्वस्थ निरोगी करण्यासाठी ध्यान किती महत्वाचे आहे आणी त्या ध्यानातून आपल्याला कसे लाभ प्राप्त करता येतात
यांचे अनुभव व शिक्षणाचे महत्व मुलांना पटवून दिले
या शिबिरात ध्यान योगासन परमात्मा प्राप्ती विश्वास यावर जोर देण्यात आला
शिबिराच्या माध्यमातून श्रमदान, वृक्षारोपण करण्यात आले
आश्रमातील श्रद्धा स्थान सद्गुरु नित्यानंद बाबाच्या मूर्ती सोबत मुला,मुलींचे छायाचित्रे घेऊन त्यांना छायाचित्रे देण्यात आले
ह्या शिबिरात श्री.शंकर देवाळकर यांनी मार्गदर्शन केले,
समाजसेवक श्री बंडू भाऊ गेडाम,श्री किंनाके महाराज यांनी सुद्धा तरुणांना मोबाईल च्या अती वापरामुळे जीवनात काय दुष्परिणाम होतात
यावर मार्गदर्शन केले, आध्यात्म असलेल्या अंधश्रद्धा दुर करण्याबाबतीत प्रकाश टाकण्यात आला.ज्योतिष्याशास्त्राचा आधार घेऊन एखादा अशुभ दोष दाखवून एखाद्याचा मनात मानसिक भीती निर्माण करून त्यांच्याकडून पूजा पाठ करवून फसवणूक करणे अश्या सारख्या दोषांना दुर करण्याचे ज्ञान शिबिरात मुलांना देण्यात आले
कु.सानिका वसंता काळे हिने
सि इ टी परीक्षेत 99.64%गुण प्राप्त केल्याबद्दल आश्रमा तर्फे सत्कार करण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी
आश्रमाचे कार्यकर्ते श्री.अनिल वडस्कर ,श्री अशोक केवट,श्री नंदकिशोर चीडे,प्रदीप कुंभे,श्री अविनाश खनके,श्री.केशव वाघमारे,श्री संजय शिंदे,श्री धोडीबा मोतिकर, श्री.दौलत मडावी,दीपक जोगी,विजय निमकर आणि इतर कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.