सशक्त लोकशाही संविधानावरच टिकून आहे – मुख्याधिकारी अरुण मोकळ
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
भारतीय लोकशाहीचे मूळ संविधानावर अवलंबून असून सशक्त लोकशाही संविधानावर टिकून असल्याचे मत नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरुण मोकळे यांनी भारताचे संविधान ग्रंथ व उद्देशिका वितरण समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले.
प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन युवा सामाजिक पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्या पुढाकाराने 27 जानेवारी रोजी संविधान ग्रंथ व उद्देशिका वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार. डॉ.शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रामप्रसाद शेळके, काँग्रेस नेते मनोज कायंदे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, तहसीलदार श्याम धनमने, राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते गंगाधर जाधव, तालुकाध्यक्ष राजू शिरसाट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण वानखेडे, युवा उद्योजक पती हाजी म. सिद्दिकी, अँड विजय सुनगत, आतिश कासारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती याप्रसंगी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावाने शहरातील सर्व शाळेतील शिक्षकांना व उपस्थित मान्यवरांना संविधान व उद्देशिका वितरण करण्यात आले.
पुढे बोलताना मुख्याधिकारी मोकळ म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वात्कृष्ट व परिपूर्ण संविधान भारतासाठी लिहिलेले म्हणून ते महामानव ठरले यावेळी माजीआमदार डॉ. खेडेकर यांनी संविधानामुळे देशात लोकशाही जिवंत असल्याचे सांगितले.डॉ. शेळके म्हणाले सविधान ग्रंथ हे डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात रुजविणे गरजेचे आहे संविधानाला अपेक्षित लोकप्रतिनिधी निवडून न देता जनतेकडून बहुसंख्याक असलेल्या उमेदवाराला निवडून दिल्या जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र खंदारे यांनी तर सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन आंधळे यांनी केले.
याप्रसंगी तहसीलदार श्याम धनमने प्रा. मधुकर जाधव, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, पत्रकार गजेंद्र गवई, आकाश मेहेत्रे, मोहन बनसोडे, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संविधानाचे महत्त्व समजावले आयोजक चंद्रकांत खरात यांनी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.