नागभीड नगर परिषद क्षेत्रात अनेक रस्त्याची दुरावस्था
विकासाचे तीन तेरा, अच्छे दिन दिसेना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभीड नगर परिषद स्थापन झाल्यानंतर नगराचा विकास होईल आणि अच्छे दिन येतील असे वाटत असताना रस्त्याचे आणि इतर योजनांचे तीन तेरा वाजले असून जनतेला त्रास होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नागभीड नगर परिषद क्षेत्रात नागभीडसह १२ गावाचा समावेश करण्यात आला. ग्रामीण विकास हा जिल्हा परिषदेच्या वतीने केला जात असल्याने बऱ्याच ठिकाणी रस्ते पाणी आणि शेतीसाठी लागणाऱ्या सर्व सोई उपलब्ध होत असे मात्र नगर परिषद स्थापन झाल्यानंतर नगराचा विकास नगर खात्याकडून होत असल्याने रोजगार निर्माण होत आहे समजून आणि शेती क्षेत्र कमी असे ठरविले जाते. पण प्रत्यक्षात ही बाब लक्षात घेतली नाही आणि इथेच विकासाची गंगा थांबली.
नगर खात्याकडून नगर परिषद क्षेत्रात पाणी, रस्ते आणि इतर योजना सुरू केल्या आहेत. पण त्या पूर्णत्वास न गेल्याने ना-ग्रामीण विकास ना-शहरी विकास अशी अवस्था नागभीड नगर परिषदेची झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक आणि मुख्याधिकारी नगर परिषदेचा विकास करण्यावर भर देणे गरजेचे होते पण निधीअभावी अनेक योजना रखडल्या आहेत. तर काही योजना विविध कारणामुळे अपूर्ण आहेत. सध्यातरी शासकीय योजनांचे तीन-तेरा वाजले असून शहराला आच्छे दीन येण्यापेक्षा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याकरिता नगर परिषद लक्ष देईल काय? असे नागरिकां नी तक्रार करूनही अपेक्षा असल्याचे सांगितले.