अखेर त्या शेतमालकावर गुन्हा दाखल
चांदा ब्लास्ट:
अतुल कोल्हे भद्रावती :-
शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन जनावरांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या त्या शेतमालकावर अखेर भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकेश मिलमीले राहणार मोहबाळा हल्ली मुक्काम चंद्रपूर असे या शेतखऱ्याचे नाव आहे.तालुक्यातील खापरी येथील अरुण पंडीले यांची जनावरे सायंकाळी चरुन परत आली नाही.दुसऱ्या दिवशी या जनावरांचा शोध घेतला असता या जनावरांपैकी दोन म्हशी लगतच्या मोहबाळा शेतशिवारातील रींकेश मिलमीले यांच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आल्या तर इतर पाच जनावरांचा अद्यापही शोध लागला नाही.घटनास्थळी भद्रावती पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असता हि दोन्ही जनावरे शेतात पिकांच्या रक्षणासाठी लावण्यात आलेल्या विद्युत स्पर्शाने मृत झाल्याचा अंदाज होता.या घटनेची तक्रार जनावरांचे मालक अरुण पंडीले यांनी भद्रावती पोलीस स्टेशनला करून आपली सात जनावरे गायप असल्याची माहीती दिली.शवविच्छेदनाचा अहवाल पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी आढळलेली दोन्ही मृत जनावरे ही शेतात लावण्यात आलेल्या विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार भद्रावती पोलीसांनी या प्रकरणात कारवाई करीत संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.