ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर आलेल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीसाठी एकरी पन्नास हजार रुपये मदतीचे परिपत्रक काढा

राज्य शेतकरी संघटनेची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसात सोयाबीन पिकावर येलो मोझॅॅक, चक्री भुंगा आणि स्टेम राॅट या तिन्ही रोगाने थैमान घातले असून यामुळे संपूर्ण सोयाबीनचे पीक बुडालेले आहे. या रोगामुळे सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडली असून किड लागल्याने झाड वाळून जाऊन शेंगा भरत नाहीत. हा बुरशीजन्य रोग असल्याने त्यावर काही उपाय या स्थितीला करता येत नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आसमानी संकटामुळे प्रचंड नैराश्यात गेला आहे. आता तातडीने या सोयाबिन उत्पादक पिडीत शेतक-यांना एकरी ५० हजार रूपयांची मदत तात्काळ मंजुर करून वितरीत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.
                 आधीच विदर्भात कर्जापायी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र काही करता थांबता थांबत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी थकीत कर्ज व विज बिल ही भरू शकत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या सोयाबीन शेतीचे सर्वेक्षणाचे आदेश देऊन शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत तात्काळ मंजूर करावी आणि तसे शासकीय परिपत्रक काढून मदत वितरित करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाडे, महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञा बापट, अनिल घनवट,शैला देशपांडे, जयश्री पाटील, अंजली पातुरकर, मदन कांबळे, मधुकर हरणे, विजय निवल, संजय कोले, गुणवंत हंगर्गेकर, सीमा नरोडे, वामन जाधव, भदाणे सर, अरुण केदार, सतीश दाणी, ओमप्रकाश तापडिया, राजाभाऊ पुसदेकर, राजेंद्रसिंह ठाकूर, शंकर ढिकले, अरूण नवले, निळकंठ कोरांगे यांचेसह शेतकरी संघटनेच्या प्रांतीय पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये