ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोदी सरकारची दडपशाही: आम आदमी कार्यकर्त्यांना विनाकारण ताब्यात घेण्यात येत आहे

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी मोदी सरकारकडून आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अनावश्यकरित्या ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असून जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, ज्येष्ठ नेते सुनिल मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहर उपाध्यक्ष सुनिल सदाभ्य्यया यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे लोकशाहीची गळचेपी होत असून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि ज्येष्ठ नेते सुनिल मुसळे यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला असून मोदी सरकारकडून होणाऱ्या या दडपशाहीचा निषेध केला आहे.

आम आदमी पार्टी लोकशाहीची रक्षण करीत राहील आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी लढत राहील. सर्वसामान्य जनतेने या घटनेचा बळी पडणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये